Rising Crime Puts Huge Burden on Kondhwa Police Station! | कोंढव्यात वाढती गुन्हेगारी आणि अपुऱ्या मनुष्यबळामुळे नागरिक त्रस्त; कोंढवा पोलीस ठाण्यावर वाढता भार! - PUNE MAJHA NEWS

Breaking

Post Top Ad

 


बुधवार, २० मे, २०२६

Rising Crime Puts Huge Burden on Kondhwa Police Station! | कोंढव्यात वाढती गुन्हेगारी आणि अपुऱ्या मनुष्यबळामुळे नागरिक त्रस्त; कोंढवा पोलीस ठाण्यावर वाढता भार!

  • कोंढवा हाताबाहेर जाण्यापूर्वी प्रशासन जागे होणार का? गुन्हेगार बिनधास्त, नागरिक त्रस्त; कोंढवा पोलीस ठाण्यावर वाढता भार!
  • कोंढव्यात वाढती गुन्हेगारी आणि अपुऱ्या मनुष्यबळामुळे निर्माण झालेली गंभीर परिस्थिती


पुणे माझा न्युज ।  प्रतिनिधी: पुणे शहरातील कोंढवा परिसर हा अत्यंत संवेदनशील भाग म्हणून ओळखला जातो. मागील काही दिवसांपासून या परिसरात वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक नागरिकांच्या चर्चेनुसार, कोंढवा पोलीस ठाण्यावर सध्या अपुऱ्या मनुष्यबळाचा मोठा ताण असून त्याचा परिणाम कायदा व सुव्यवस्थेवर होताना दिसत आहे.

दोन दिवसांपूर्वी कोंढवा परिसरात दोन गटांमध्ये तुफान मारामारी झाल्याची गंभीर घटना घडली होती. या घटनेचे पडसाद इतर परिसरातही उमटले असून बाहेरील व्यक्ती मोठ्या संख्येने परिसरात दाखल झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. परिस्थिती अधिक गंभीर स्वरूप धारण करण्यापूर्वी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त मागवून पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली, ही निश्चितच दिलासादायक बाब आहे. मात्र, आजही परिसरातील परिस्थिती चिंताजनक असल्याची भावना स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.


स्थानिकांच्या मते, अपुऱ्या मनुष्यबळामुळे गुन्हेगारांमध्ये पोलिसांचा धाक कमी होत चालला असून काही गुन्हेगार प्रशासनालाच खुलेआम आव्हान देत असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे चोरी, मारामाऱ्या, दहशत निर्माण करणे अशा घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.


विशेषतः महिला वर्गामध्ये असुरक्षिततेची भावना वाढली असून अनेक नागरिक भीतीच्या वातावरणात जीवन जगत असल्याचे सांगितले जात आहे. नागरिकांनी प्रशासनाकडे कोंढवा पोलीस ठाण्यास तातडीने पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे, जेणेकरून परिसरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील आणि वाढती गुन्हेगारी नियंत्रणात आणता येईल.


समाजहित आणि नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने तातडीने लक्ष घालून आवश्यक उपाययोजना करणे गरजेचे आहे. अन्यथा भविष्यात परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Top Ad